अक्षय तृतीयेचे महत्त्व
          अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

अर्थ
        सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.

मृतिका पूजन
        सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मृतिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे व पेरणी
        पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
           (पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

वृक्षरोपण
        अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व
        अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्‍ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्‍ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

To Use on orkut, facebook, hi5 etc?
1) Right Click on image
2) Click on Copy image location
3) and Paste in friends scrapbook for wishes :)















 
सिद्धार्थ जाधव - ( निळू फुले ) 



 सई ताम्हणकर - ( रंजना ) 



भरत जाधव - ( दादा कोंडके ) 



उपेंद्र लिमये - ( चंद्रकांत मांडरे ) 



मुक्ता बर्वे - ( स्मिता पाटील : जैत रे जैत ) 



अंकुश चौधरी - ( अरुण सरनाईक ) 



सोनाली कुलकर्णी - ( जयश्री गडकर ) 



मकरंद अनासपुरे - ( राजा गोसावी ) 



उर्मिला कानेटकर - ( शांता आपटे ) 



सुबोध भावे - ( डॉ. काशिनाथ घाणेकर ) 




अमृता खानविलकर - (दुर्गा खोटे) 



संजय नार्वेकर - ( लक्ष्मीकांत बेर्डे )


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

"आई माझा हा दात किती दिवसापासून हलतोय? केंव्हा पडणार हा दात?" सलोनीने, माझ्या ५ वर्षाच्या मुलीने मला विचारले.
"केंव्हाही पडूदेत. काय फरक पडतो?"
"अस कस? माझा पहिला दात मग टूथ फेरी घेवून जाईल सोन्याचा करायला आणि मला गिफ्ट पण देईल."
"अच्चा म्हंजे तू गिफ्ट ची  वाट पाहते आहेस तर."
"हो ग आई. रेवाची ताई म्हणते कि टूथ फेरी वगैरे अस काही नसत. खर आहे का ग ते?" निरागसपणे सलोनीने मला विचारले. मला एक क्षण कळलेच नाही कि तिला काय उत्तर द्यावे? टूथ फेरी मी माझ्या लहानपणी पण ऐकली होती. आता त्यातला पोकळपणा मला कळत होता पण सलोनीला काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते. खर उत्तर देवून तिच्या भाव विश्वाला धक्का लावायची माझी इच्चा अजिबातच नव्हति.
"सांगना ग आई टूथ फेरी खरच असते का?" मी काही उत्तर देत नाही पाहून सलोनीने मला परत विचारले.
"मला नाही आठवत ग मला टूथ फेरी ने येवून मला काही गिफ्ट दिले होते का ते. आपण तुझ्या वेळी पाहूयात ती खरच असते का ते." असा सांगून मी वेळ मारून नेलि.
घराच्या, ऑफिसच्या कामाच्या नादात मी टूथ फेरीला विसरून पण गेले होते. ७ - ८ दिवस झाले असतील अचानक सलोनीच्या पाळणा घरातून मला ऑफिसमध्ये फोन आला. "आई आज आपल्याला कळेल टूथ फेरी असते कि नाही ते. माझा पहिला दात पडला आहे आणि मी तो घरी आणला आहे. बघू आज रात्री टूथ फेरी मला काय गिफ्ट देते?"
सलोनीचे बोलणे ऐकून मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. मला फक्त इतकच कळत होत कि टूथ फेरी बाबत सलोनी खूपच भावनिक झाली होती. माझा गोंधळ उडाला होता सलोनीला टूथ फेरी बद्दल खरी कल्पना द्यावी कि तीच तिला समजण्याची वाट पहावी,हेच कळत  नव्हते.
"आई बघ टूथ फेरी ने मला २० रुपये दिले आणि माझा दात घेवून गेलि." आनंदाने उठत सलोनीने मला २०  रुपये दाखवले.
"अग नाही खरच टूथ फेरी ने माझ्या उशीखाली ठेवले होते पैसे. माझ्या आईने पण पाहिले. " सलोनी तिच्या मैत्रिणीशी फोन वर बोलत होति. 
तिची ती निरागसता, माझ्यावरचा तिचा  विश्वास पाहून मला एकदम गलबलून आले. तीच भावविश्व जपताना कुठे तरी मी तिचा माझ्यावरच्या विश्वासाला तर तडा जावू देत नव्हते ना? उद्या तिला टूथ फेरी बद्दल खरे कळेल त्यावेळी तिला काय वाटेल? काळाच्या ओघात खरे काय आहेते कळतेच पण एकदा विश्वासाला तडा गेला कि तो परत मिळत नाही हा मोठ्ठा धडा टूथ फेरी मला देवून गेली होति.

आभार - लेखिका : राजश्री जोशी 



चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?
* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?
* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.

रामनवमी व्रताचे फ
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी